कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Friday 2 September 2011

बहुजनांनो उघडा डोळे बघा नीट..

      बाबासाहेब असे कधीच बोलले नाहीत कि हिंदू धर्म संपवा,ब्राह्मणाला देशाबाहेर काढा.....
त्यांना हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था खटकत होती....त्या धर्मातील काही गोष्टी बदलण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल आणले पण पुढे त्यांना विरोध होत राहिला म्हणून त्यांना नाईलाजाने धर्म परिवर्तनाचा निर्णय घ्यावा लागला....

     हे त्यांनी कित्येकदा बोलूनही दाखवले, कि त्यांचा लढा 'ब्राह्मण विरुद्ध बहुजन' असा नव्हता ! तर समाजातील 'उपेक्षित वर्ग विरुद्ध प्रस्थापित वर्ग' असा होता, पण ते असे कधी बोलले नाहीत कि 'प्रस्थापितांना देशातून हाकलले पाहिजे!'

    पण आज काल हे बामसेफ आणि बी ग्रेड सारख्या संघटना यांनी हे नवीन फंडे काढलेत,ईथे एक गोष्ट लक्षात घ्या कि बी ग्रेड हि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे पिल्लू नाही,बामसेफ या संघटनेने त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी मराठा सेवा संघ व ओबीसी सेवा संघ अश्या संघटना जन्माला घातल्या....

     त्यातील मराठा सेवा संघाने संभाजी बिग्रेड हि लढाऊ संघटना उभारली कि ज्या अंतर्गत मराठा युवकांना भडकावणे सोपे जाईल...
दलितांवर अन्याय झाला असल्याने दलित युवक भडकावणे सोपे असते पण मराठा युवकांना भडकावयाचे कसे तर त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराजांचे नाव वापरून...
ब्राह्मणाच शिवाजी महाराजांची बदनामी करतात हे कोणत्याही प्रकारे मराठा युवकांवर बिम्बवयाचे आणि त्यांची टाळकी भडकावयाची हा एककलमी कार्यक्रम बी ग्रेड ने राबवलेला दिसतोय....

    बहुजनांनी योग्य विचार केला नाही तर नंतर या देशातून बाहेर जाण्यात त्यांचा नंबर लागेल,आणि मुख्य षड्यंत्र इस्लामी आणि ख्रिस्ती ह्यांचे आहेत....

    हिंदू धर्म फोडण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणवर यांना पैसा पुरवला जातो,हे ह्यांचे संघटनांचे हिशोब लोकांसमोर का ठेवत नाहीत,ह्यांच्या अधिवेशनाला कोट्यावधी रुपये खर्च केले जातात कुठून येतो हा पैसा ?
    बामसेफ चे २ भागात विभाजन झाले त्यातील १ बामसेफ (बोरकर) २ बामसेफ (मेश्राम) असे का झाले ? कश्यावरून वाद झाले असणार साहजिकच आहे,पैसा कारण राजकीय संघटना नसल्याने सत्तेचा प्रश्नच येत नाही....

    मित्रांनो उघडा डोळे बघा नीट,
    दलितांचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालू आहे त्यावर का हे लोक काही बोलत नाहीत,कसे बोलणार उनकी बिल्ली उनको म्याव नही करेगी....
उत्तर पूर्व भागात असणारी बौद्धांची ८०% लोकसंख्या ५० वर्षात ४/५% आली, ख्रिस्ती मिशनरी कडून प्रदेश सोडून जायच्या धमक्या त्यांना येत आहेत....
    बौद्ध मठांच्या जागा ख्रीस्तींकडून हडप करण्यात आल्या आहेत,शासन धर्मनिरपेक्ष असल्याने ख्रीस्तींचे लाड करते,आणि सत्तेवर पण ख्रिस्तीच आहेत,लडाख सारख्या भागात बौद्ध मुलींचे अपहरण त्यांचे धर्मांतरण,पुरुष्यांच्या हत्या अश्या अनेक प्रकारे मुस्लिमांकडून अन्याय चालू आहे,का नही हे बामसेफ वाले तोंड उघडत कारण साफ आहे,जनतेने ह्यांच्या पासून सावध राहावे,

   जय भीमराय ! जय शिवराय

   -विकास खरात

1 comment:

  1. विकास मी आपल्याशी सहमत आहे.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नक्कीच असा भारत अपेक्षित नव्हता. त्यांनी वाईट प्रवृत्तींना विरोध केला त्यांनी एखाद्या समाजाचा तिरस्कार नाही केला. म्हणूनच रघुनाथ केशव कर्वे यांचे वकीलपत्र घ्यायला कोणीच पुढे येत नव्हते तेंव्हा त्यांनी स्वताहून पुढे येऊन ते आपल्या हाती घेतले. तेंव्हा त्यांनी त्यांची जात अजिबात बघितली नाही.

    ReplyDelete